शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला बसणार चाप, विभागीय आयुक्तांचे आदेश : ग्रामपंचायतीत उपस्थिती बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:11 IST

कोल्हापूर : ऊठसूट बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला चाप लावण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये थांबणे

ठळक मुद्दे ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला बसणार चाप विभागीय आयुक्तांचे आदेश : सकाळी ९ ते सायंकाळी ५ ग्रामपंचायतीत उपस्थिती बंधनकारक

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ऊठसूट बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला चाप लावण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये थांबणे बंधनकारक केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्हा परिषदांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुण्यात झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबत गांभीर्याने चर्चा झाली होती. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक अधिकाधिक वेळ ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला होता. याला अनुसरून विभागीय आयुक्तांनी सविस्तर आदेश दिले असून, आता केवळ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारीच ग्रामसेवकांना पंचायत समितीमध्ये बैठकीसाठी यावे लागणार आहे.

एका ग्रामसेवकाकडे शक्यतो एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार देऊ नये, रजेवर गेलेल्या ग्रामसेवकाचा कार्यभार लगतच्या ग्रामसेवकाकडे द्यावा, केवळ पहिल्या, तिसºया सोमवारी तालुक्याला आढावा बैठक घ्यावी, त्याची विषयसूची तयार करून आधीच पाठवावी, सकाळी १० वाजता ही बैठक सुरू करावी, याच दिवशी ग्रामसेवकांनी विभागप्रमुखांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी भेटी घ्याव्यात. या आढावा सभेला हजर राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यासाठी एक पालक अधिकारी नेमावा, असे या आदेशात म्हटले आहे.अपवादात्मक परिस्थितीत विस्तार अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडावे, प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर ग्रामसेवकाच्या कामाचा दिवस व पंचायत समिती भेटीचा दिवस फलकावर लिहावा.वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णयविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गावोगावी दौरे करताना ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक फार वेळ उपस्थित नसतात, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या. ग्रामसेवकांशी बोललो तर ते म्हणतात, एवढ्या योजना आहेत की, त्या कामांसाठी आणि आढावा बैठकांसाठी आम्ही पंचायत समितीमध्ये जास्त वेळ असतो. प्रत्येक खात्याचा अधिकारी स्वतंत्रपणे ग्रामसेवकाला बोलावत असल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. म्हणूनच याबाबत साकल्याने विचार करून विकासकामे वेळेत व्हावीत आणि ग्रामसेवकांचीही अनावश्यक धावपळ वाचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.बैठकीचे वेळापत्रकही निश्चितमहिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी होणाºया पंचायत समितीमधील बैठकीचे वेळापत्रकही विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार करून दिले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कोणत्या विभागांचा आढावा घ्यायचा आणि त्यामध्ये अधिकाºयांनी नेमके काय योगदान द्यायचे याची सविस्तर माहिती या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.पाच जिल्ह्यांत ३५०० ग्रामसेवकपुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत ६५०० गावे असून ५५०० ग्रामपंचायती आहेत; तर ३५०० ग्रामसेवक कार्यरत आहेत. २००० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असल्याने एका ग्रामसेवकाकडे तीन-चार ग्रामपंचायतीही देण्यात आल्या आहेत. त्याचा पुनर्विचार आता करण्यात येणार आहे.शेतकरी, ग्रामस्थांची सोय महत्त्वाचीग्रामीण भागामध्ये सकाळी लवकर शेतकरी, ग्रामस्थ आपल्या कामासाठी निघून जातात. नंतर ग्रामसेवक येतात. त्यामुळे कामात दिरंगाई होते; म्हणूनच यापुढे ग्रामसेवकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.